अवकाळी पावसाची उघडीप, शेतीकामाला आला वेग   

ओतूर, (वार्ताहर) : गेल्या बारा दिवसापासून अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि सततच्या पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या पिके जगणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती, मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने संधीचे सोने करण्यासाठी शेतकरी जोमाने कामाला लागला आहे.आता अंतिम टप्यातील पीक कोबी फ्लावर, केळी, बाजरी काढणीचा श्रीगणेशा करताच पुन्हा पावसाने थैमान घातले होते. एकाचवेळी सर्वच पिकांची कामे सुरू झाल्याने मजुरांचाही तोरा वाढला आहे. सद्या महिला मजुराला ४०० ते ५५० रुपये व पुरुष मजुराला ६५० ते ७०० रुपये हजेरी आहे. सद्या टोमॅटो, झेंडू, कोबी, फ्लावर, चवळी, वांगी, बाजरी, मिरची अशा विविध पिकातील खुरपणी, तोडणी, बांधणी, चाळणी, लावणी अशी बहुतेक कामे सुरू आहेत.
 
यंदा उन्हाळी हंगामाच्या मे च्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने सर्वच पिकाचे मोठे नुकसान झाले. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीड-रोगराईचा प्रादुर्भाव झाला होता. यावर प्रचंड प्रमाणात त भांडवली खर्च करून फवारणी करुन शेतकर्‍यांनी मात केली, पण पावसाने उघडीप दिल्याने वाचलेली पीके काढणीला सुरुवात केली आहे. मात्र, मजुरांचा प्रश्न हा कायम आहे. शेतकर्‍यांची अवस्था पाहून अधिकची मजुरी आकारली जात आहे. उत्पादन खर्च आणि मजुरीमुळे अडचणी वाढल्या आहेत पाहायला मिळत आहे.यंदा सुरुवातीला जास्त पाऊस पडल्याने पिकांचे भरपूर नुकसान झाले. मात्र, तालुक्यात पिकांचे नुकसान असतांना देखील शेतकर्‍यांचे पंचनामे होण्यासाठी खूप उशीर झाला नुकसान होऊन कोणी वंचित रहायला नको, अशी शासनाने दखल घेतली पाहिजे असे शेतकरी बोलत आहेत.

Related Articles